शिवपूर्वकालीन महाराष्ट्र

शिवपूर्वकालीन महाराष्ट्र

सतराव्या शतकाच्या सुरुवातीस महाराष्ट्रातील
बहुतांश प्रदेश अहमदनगरचा निजामशाह आणि
विजापूरचा आदिलशाह यांच्या ताब्यात होता.
मुघलांचा खानदेशामध्ये शिरकाव झालेला होता.
दक्षिणेमध्ये आपला सत्ताविस्तार घडवून आणणे हे
त्यांचे उद्दिष्ट होते. कोकणच्या किनारपट्टीवर
आफ्रिकेतून आलेल्या सिद्दी लोकांच्या वस्त्या
होत्या. याच काळात युरोपातून आलेल्या पोर्तुगीज,
इंग्रज, फ्रेंच ब डच इत्यादी सत्तांमधील सागरी स्पर्धा
आणि संघर्ष तीव्र होत होता. त्यांच्यात व्यापारासाठी
बाजारपेठा काबीज करण्याची चढाओढ लागली
होती. पश्‍चिम किनारपट्टीवरील गोव्यात आणि
वसईत पोर्तुगिजांनी अगोदरच राज्य स्थापन केले
होते; तर इंग्रज, डच, फ्रेंच यांनी व्यापारी कंपन्यांच्या
माध्यमांतून वखारींच्या रूपात चंचुप्रवेश केला होता.
या सर्व सत्ता एकमेकांना आजमावत व स्वतःला
सुरक्षित ठेवत. तसेच जमेल तेवढे वर्चस्व करण्याच्या
बेतात होत्या. या संघर्षामुळे महाराष्ट्रात अस्थिरता व
असुरक्षितता निर्माण झाली होती. युरोपातील या
वेगवेगळ्या लोकांना त्यांच्या शिरस्त्राणावरून
'टोपकर' म्हणत.

शिवपूर्वकाळातील लोकवस्ती, प्रजा आणि
राज्यकर्ते यांच्यामधील दुवा म्हणून कार्य करणारे
अधिकारी, बाजारपेठा, कारागीर वगैरेंचे स्वरूप
समजण्यासाठी गाव (मौजा), कसबा आणि परगणा
या भौगोलिक स्थानांची ओळख होणे आवश्यक
आहे. अनेक गावांचा परगणा होत असे. सामान्यतः
परगण्याच्या मुख्य ठिकाणाला कसबा म्हणत असत.
कसवब्यापेक्षा लहान असलेल्या गावाला मौजा म्हणत
असत. आपण आता गाव, कसबा आणि परगणा
यांची क्रमशः संक्षिप्त ओळख करून घेऊ.

गाव (मोजा) : बहुतेक लोक गावामध्येच
राहत. गावाला मौजा असेही म्हणत. पाटील हा
गावाचा प्रमुख असे. लोकांनी गावातील जास्तीत
जास्त जमीन लागवडीखाली आणावी, यासाठी तो
प्रयत्न करी. गावामध्ये तंटाबखेडा होत असे, तेव्हा
शांतता निर्माण करण्याचे काम पाटील करत असे.
त्याच्या कामात कुलकर्णी मदत करत. जमा झालेल्या
महसुलाची नोंद करणे हे काम कुलकर्णी करत असे.
गावामध्ये निरनिराळे कारागीर असत. त्यांच्याकडे
व्यवसायासंबंधीचे हक्क वंशपरंपरेने चालत आलेले
असत. गावात कारागीर जी सेवा देत असत,
त्याबद्दल शेतकऱ्यांकडून त्यांना शेतीतील उत्पन्नाचा
काही वाटा मिळे. त्यास बलुतं असे म्हणत.

कसबा : कसबा हे एक मोठे खेडेगावच असे.
सामान्यतः ते परगण्याचे मुख्य ठिकाण असे.
उदा., इंदापूर परगण्याचे मुख्य ठिकाण इंदापूर कसबा,
वाई परगण्याचे मुख्य ठिकाण वाई कसबा. गावाप्रमाणेच
कसवब्यामध्ये मुख्य व्यवसाय शेतीचा असे. तेथे सुतार,
लोहार इत्यादी कुशल कारागीरही असत. कसब्याला
जोडूनच बाजारपेठ असे. शेटे ब महाजन हे पेठेचे
वतनदार कारभारी असत. प्रत्येक गावात पेठ होतीच
असे नाही. मात्र गावात पेठ वसवण्याचे काम शेटे-
महाजनांचे असे. त्यासाठी त्यांना सरकारातून जमीन
आणि गावकऱयांकडून काही हक्‍क मिळत. पेठेचे
हिशोब ठेवण्याचे काम महाजन पाहत असे.

परगणा : अनेक गावे मिळून परगणा होत
असला तरी सर्व परगण्यांतील गावांची संख्या समान
नसे. उदा., पुणे परगणा. हा मोठा परगणा होता.
त्यात २९० गावे होती. चाकण परगण्यात ६४ गावे
होती. शिरवळ परगणा लहान होता. त्यात ४० गावे
होती. देशमुख व देशपांडे हे परगण्याचे वतनदार
अधिकारी असत. देशमुख हा परगण्यातील पाटलांचा
प्रमुख असे. गावपातळीवर जे काम पाटील करत
असे तेच काम परगणा पातळीवर देशमुख करत असे.
तसेच परगण्यातील सर्व कुलकर्ण्यांचा प्रमुख देशपांडे
असे. गावपातळीवर कुलकर्णी जे काम करत असे,
ते काम परगणा पातळीवर देशपांडे करत असे. हे
बतनदार अधिकारी रयत आणि सरकार यांच्यामधील
दुबा होते.

परगण्यातील गावांवरती कधी परचक्र आले
किंबा दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली, तर
रयतेचे म्हणणे सरकारकडे मांडण्याचे काम वतनदार
करत. काही वेळेला हे अधिकारी आपल्या
अधिकाराचा दुरुपयोग करत. ते कधी रयतेकडून
अधिक पैसा जमा करत, तर कधी रयतेकडून गोळा
केलेली रक्‍कम सरकारकडे जमा करण्यास विलंब
लावत. अशा वेळी प्रजा त्रासली जात असे.

दुष्काळाचे संकट : शेती ही पावसाच्या
पाण्यावर अवलंबून असे. पाऊस पडला नाही तर शेतात पीक येत नसे. मग अन्नधान्याचे भाव वाढत.
लोकांना अन्नधान्य मिळणे मुश्कील होई. जनावरांना
चारा मिळत नसे. पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होई.
लोकांना गावात राहणे कठीण होई. लोक गाव
सोडत. लोकांवर परागंदा होण्याची वेळ येई. दुष्काळ
हे रयतेला सर्वांत मोठे संकट वाटे.

महाराष्ट्रामध्ये असाच एक मोठा दुष्काळ इ.स.१६३० मध्ये पडलेला होता. या दुष्काळाने
लोक हबालदिल झाले. धान्याची तीव्र टंचाई निर्माण झाली. भाकरीच्या तुकड्यासाठी लोक स्वतःला
विकून घेण्यास तयार होते, पण विकत घेणाराच कोणी नव्हता, असे वर्णन वाचायला मिळते. कुटुंबे
उद्‌ध्वस्त झाली, गुरे-ढोरे मेली. शेती व्यवसाय खचला. उद्योगधंदे संपुष्टात आले. आर्थिक व्यवहार
खुंटले. लोक देशोधडीला लागले. अशा उद्ध्वस्त  झालेल्या लोकजीवबनाची घडी बसवणे हे एक मोठे
आव्हान होते.

वारकरी पंथाचे कार्य : अंधश्रद्धा वब कर्मकांड यांचा समाजावर जबरदस्त पगडा होता. लोक दैववादाच्या आहारी गेले होते. त्यांची प्रयत्मशीलता थंडावली होती. रयतेची स्थिती फारच हलाखीची
होती. अशा परिस्थितीत समाजात चैतन्य निर्माण करण्याचे प्रयत्न महाराष्ट्रातील वारकरी पंथाने केले.

महाराष्ट्राता संत नामदेव, संत ज्ञानेश्‍वर यांच्यापासून सुरू झालेली संतपरंपरा समाजाच्या
विविध स्तरांतून आलेल्या संतांनी पुढे चालवली. या संत परंपरेमध्ये समाजातील सर्व स्तरांतील लोक होते.

उदा., संत चोखामेळा, संत गोरोबा, संत सावता, संत नरहरी, संत सेना, संत शेख महंमद इत्यादी.
त्याचप्रमाणे संत मंडळींत संत चोखोबांची पत्नी संत सोयराबाई आणि बहीण संत निर्मळाबाई, संत
मुक्ताबाई, संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत बहिणाबाई सिऊरकर यांसारख्या स्त्रियाही होत्या. या
संत चळवळीचे पंढरपूर हे केंद्र होते. विठ्ठल हे त्यांचे दैवत होते. पंढरपुरात चंद्रभागेच्या काठी ही
सर्व संतमंडळी आणि वारकरी भक्‍्तिसागरात न्हाऊन
निघत. तेथे भजन, कीर्त आणि सहभोजन (काला)
या माध्यमातून समतेचा प्रसार होई.

संत नामदेव
 हे वारकरीसंप्रदायातील एक श्रेष्ठ संतहोते. ते कुशल संघटक होते.ते उत्तम कीर्तनकारही होते.कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनीसर्व  जाती-जमातींमधील स्त्री- पुरुषांना एकत्र करून
त्यांच्याता समतेची भावना जागवली. 
'नाचू कीर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू
जगी ॥। ही त्यांची प्रतिज्ञा होती.
 त्यांची अभंगरचनाप्रसिद्ध आहे. अनेक संतांवर आणि सर्वसामान्य
लोकांवर त्यांच्या शिकवणुकीचा प्रभाव पडला. ते आपल्या विचारांचा प्रसार करत पंजाबपर्यंत गेले
होते. त्यांनी लिहिलेली पदे शिखांच्या 'गुरुग्रंथसाहिब' या ग्रंथात समाविष्ट आहेत. त्यांनी भागवत धर्माचा
संदेश गावोगावी पोचवण्याचे कार्य केले. त्यांनी पंढरपूर येथे बिठ्ठलाच्या महादूबारासमोर संत
चोखामेळा यांची समाधी बांधली. हे त्यांचे कार्य अविस्मरणीय आहे.

संत ज्ञानेश्‍वर : हे वारकरी संप्रदायातील एक
विख्यात संत होत. त्यांनी 'भगवद्‌गीता' या संस्कृत
ग्रंथाचा अर्थ मराठीत
स्पष्ट करणारा
“भावार्थदीपिका अर्थात
'ज्ञानेश्‍्वरी' हा ग्रंथ रचला. तसेच त्यांनी
'अमृतानुभव' या ग्रंथाची रचना केली. त्यांनी आपल्या ग्रंथांतते ब अभंगांतून भक्तिमार्गाचे
महत्त्व सांगितले. सामान्यांना आचारता येईल, असा आचारधर्म सांगितला. वारकरी संप्रदायाला धर्माची
प्रतिष्ठा मिळवून दिली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये जीवन जगावे लागलेले असूनही त्यांनी

आपल्या मनाचे संतुलल ढळू दिले नाही आणि कटुताही बाळगली नाही. ज्ञानेश्‍वरीतील “'पसायदान' उदात्त संस्कार करणारे आहे. ज्ञानेश्वरांचे बंधू संत निवृत्तिनाथ ब संत सोपानदेव आणि भगिनी मुक्ताबाई
यांच्याही काव्यरचना प्रसिद्ध आहेत.

संत एकनाथ 
हे महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीतील एक महान संत होत. त्यांचे साहित्य
बिपुल व विविध प्रकारचे आहे. त्यात अभंग, गोळणी, भारुडे इत्यादींचा
समावेश होतो. त्यांनी भागवत धर्माची मांडणी
सोपी ब सविस्तर केलेली आहे. भावार्थ रामायणात
रामकथेच्या निमित्ताने लोकजीवनाचे चित्र रेखाटले आहे. त्यांनी भागवत या संस्कृत ग्रंथाच्या
भकक्‍्तीविषयक भागाचा अर्थ मराठीत विशद केला.
त्यांच्या अभंगात जिव्हाळा आहे. परमार्थप्राप्तीसाठी प्रपच सोडण्याची आवश्यकता नाही, हे त्यांनी स्वतःच्या आचरणाने दाखवून दिले. ते खऱया अर्थाने लोकशिक्षक होते. आपली मराठी भाषा कोणत्याही
भाषेपेक्षा कमी नाही असे ते मानत. 'संस्कृत वाणी

देवे केली । तरी प्राकृत काय चोरापासुनि झाली ?'
असे त्यांनी संस्कृत पंडितांना ठणकावून विचारले.
त्यांनी इतर धर्मांचा तिरस्कार करणारांवर कडक टीका केली आहे.

 
संत तुकाराम : हे पुण्याजबळील देहू गावचे.
 त्यांची अभंगरचना प्रसन्न  आणि प्रासादिक आहे. त्यांच्या अभंगांना श्रेष्ठ कवित्वाची उची लाभलीआहे. संत तुकारामांची 'गाथा' ही मराठी भाषेचा संत तुकाराम अमोल ठेवा आहे

Popular posts from this blog

पृथ्वीची आवरणे

महाराष्ट्रातील नद्या

केंद्रीय कार्यकारी मंडळ